Solar Pump Scheme : महावितरणने ओलांडला सौर कृषिपंपांचा ५० हजारांचा टप्पा

Solar Pump Scheme : महावितरणने ओलांडला सौर कृषिपंपांचा ५० हजारांचा टप्पा

 

शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देणाऱ्या

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेअंतर्गत पंप बसविण्यात महावितरणने सहा महिन्यांत पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याची सूचना महावितरणला दिली असून त्यानुसार युद्ध पातळीवर काम सुरू आहे,

असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

 

मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिंता नाही, असे सौर कृषिपंपांचे वैशिष्ट्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे.

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान कुसुम-बी या योजनेच्या आधारे ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

त्यानुसार महावितरणकडे फेब्रुवारी महिन्यात २ लाख ७० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,६४,४६४ शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरली असून .

त्यापैकी ५०,४१० अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्यात आले आहेत. ऊर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात लवकरच पंप बसविण्यात येतील.

 

या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे पंप मंजूर होतात.

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते.

शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *